नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील केमिकल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या समोर नव्या संधींचे क्षितिज खुले करण्यासाठी “संकल्प १.० ” या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले.

या परिषदेत तांत्रिक कार्यशाळा, थेट प्रकल्प सादरीकरण,शोधनिबंध सादरीकरण, उद्योगसंबंधित समस्या सोडविण्याच्या स्पर्धा, तसेच पोस्टर सादरीकरण यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटन सोहळा दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी उत्साही वातावरणात पार पडला.

उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. योगेश दशरथे,डॉ.गिरीश देशपांडे, डॉ.एस.श्रीधर,आणि रवी भोसले उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक भूमिका बजावली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे होते. यावेळी अधिष्ठाता प्रा.संजय देठे आणि विभागप्रमुख व परिषद चे संयोजक डॉ. प्रकाश जाधव उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. वहीद देशमुख,डॉ.संदीप मुंढे,डॉ आनंद चव्हाण व तसेच अधिष्ठाता डॉ. अनिल गोंडे, डॉ. अभिजित नांदेकर,विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेच्या उद्दिष्टांवर भाष्य करताना संचालक डॉ. मनेश कोकरे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीपुरते सीमित न राहता नवकल्पनांच्या माध्यमातून स्वतःचा उद्योजकीय प्रवास घडवावा.अशा उपक्रमांमुळे संस्थेच्या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक वातावरणाला अधिक बळकटी मिळते.विभागप्रमुख व परीषदेचे संयोजक डॉ. प्रकाश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपली सृजनशीलता वाढवावी.
प्रा.संजय देठे यांनी बोलताना म्हणले “संकल्प १.०”परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. तसेच स्पर्धक,संयोजक, विद्यार्थी स्वयंसेवक आणि आयोजकांचे आभार मानले.या परिषदेचे यशस्वी आयोजनासाठी प्रा. गिराम, प्रा.पवार तसेच विद्यार्थ्यांनी योगदान दिले.

