HomeकृषीTehsildar Kishore Yadav ; शेतकरी ओळख पत्रासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद तातडीने...

Tehsildar Kishore Yadav ; शेतकरी ओळख पत्रासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद तातडीने करावी – तहसीलदार किशोर यादव

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख पत्र बनविण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्रात जाऊन आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.

यापुढील काळात शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजना, पीक विमा, नैसर्गीक आपत्ती अनुदान, पिक कर्ज व इतर शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत तशी नोंदणी करणे आवश्यक आहे.त्याशिवाय कुठल्याही शासकीस योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.

असा खुलासा करून तहसीलदार किशोर यादव यांनी शेतकरी ओळख क्रमांक काढण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक तसेच शेतीचा गट क्रमांक नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्रात देऊन आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी,असे कळविले आहे.

तसेच आपल्या तालुक्यात ई पीक पाहणीचे प्रलंबीत कामकाज आपले गावचे महसूल अधिकारी यांच्या सहाय्यका मार्फत केले जात आहे. ज्यांची ई पीक पाहणी झाली नाही, त्या शेतकऱ्यांनी दि. २८ फेब्रु. पर्यंत सहाय्यका मार्फत ती करून घ्यावी, असेही तहसीलदार यादव यांनी स्पष्ट केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments