हदगाव, गौतम वाठोरे| ऑगस्ट महिन्यापासून तालुक्यामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पैनगंगा नदी कयाधू नदी लाखाडी नदी या तिन्ही नदीला महापूर आला असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी खरडून गेले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे शेती उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. तर गावांमध्ये पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी जाऊन अनेकांचे संसार उपयोगी साहित्य यामध्ये वाहून गेले आहे.



ऑगस्ट महिन्यापासून सतत धार पाऊस असल्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहे तर शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहे अशामध्ये सरकार तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसत आहे सदरील मदत शेतकऱ्यांना मान्य नसून हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी थेट बांधावरून मुख्यमंत्री यांच्याशी केली आहे केली आहे.

काल त्यांनी हदगांव तालुक्यातील रुई धानोरा कोथळा नदीकाठच्या सर्वच गावांची पाहणी केली असून थेट मुख्यमंत्री यांना दूरध्वनीवरून सदरील तुम्ही देत असलेली मदत शेतकऱ्यांना मान्य नसून ग्रामपंचायत चा ठराव घेऊन आम्ही दिलेली मदत परत करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कारण या तुटपुंजी मदतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नसून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेती उपयोगी साहित्य वाहून गेलेले त्यांना वेगळी मदत करण्यात यावी नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांना सुद्धा वेगळी मदत करून सरकारने शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट दूरध्वनी वरून करण्यात आली आहे.


त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना हदगाव हिमायतनगर शेतकऱ्यांचा व्यथा त्यांनी सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली नसल्यास मी स्वतः बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे. हदगाव हिमायतनगर मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रल्हाद पाटील सूर्यवंशी सोडवीत असतात त्यांच्या प्रत्येक उपोषणाची आंदोलनाची शासन दखल घेत असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्याच्या प्रतिक्विंटल मागे पुरग्रस्त भागांना मदत म्हणून १५ रुपये शेतकऱ्यांचे शासन कट करीत आहे अशी चर्चा आहे.

असं न करता शासकीय कर्मचाऱ्यांचे पैसे काटण्यात यावे असे विनंती मुख्यमंत्र्याकडे त्यांनी केली आहे. अगोदर शेतकरी परेशान असून व उसाचे उत्पन्न घटले असून दुष्काळात तेरावा महिना या सरकारने शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना देऊ नये अशी ही विनंती मुख्यमंत्र्यांच्या सोबत संवादनात म्हंटले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव वानखडे.रुई धानोरा कोथळा येथील अनेक शेतकरी बाबुराव शिंदे, दिगंबर शिंदे. लक्ष्मण शिंदे, भास्कर पाईकराव. सोपान शिंदे व असंख्य शेतकरी उपस्थित होते.
