Sunday, May 24

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Aanganwadi worker commits suicide : सासरच्या जाचाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या; पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल

Aanganwadi worker commits suicide : सासरच्या जाचाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या; पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील अंगणवाडी सेविका वनमाला उर्फ संध्या समृत कांबळे (वय 38) यांनी सासरच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मयत महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शंकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी वनमाला उर्फ संध्या हिचे लग्न पिंपळदरी (ता. लोहा) येथील समृत सखाराम कांबळे यांच्याशी सुमारे 15 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन मुले असून वनमाला पिंपळदरी येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. पती समृत कांबळे यांच्याकडून मोटारसायकल घेणे व घर बांधकामासाठी पैशांची मागणी करून तिला सातत्याने त्रास दिल...
Cemetery and graveyard encroachment : 1992 पासून स्मशानभूमी व कब्रस्तान अतिक्रमणात; 2400 लोकसंख्या असलेल्या आंदेगावला अंत्यविधीसाठी जागाच नाही

Cemetery and graveyard encroachment : 1992 पासून स्मशानभूमी व कब्रस्तान अतिक्रमणात; 2400 लोकसंख्या असलेल्या आंदेगावला अंत्यविधीसाठी जागाच नाही

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर/नांदेड (विशेष प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तान ही जमीन सन 1992 पासून अतिक्रमणाखाली असून, तब्बल तीन दशकांपासून गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी स्वतःची हक्काची जागा मिळालेली नाही. विशेष म्हणजे सदर जमीन ही त्याच कुटुंबाने गावाच्या हितासाठी हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानासाठी दिली होती. मात्र आज दुर्दैवाची बाब अशी की, त्या कुटुंबालाच आणि संपूर्ण गावालाच बेवारस जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. आंदेगावची लोकसंख्या आज सुमारे 2400 च्या आसपास असूनही, गावात एकही सुरक्षित व अधिकृत अंत्यविधीची जागा उपलब्ध नाही. याबाबत माननीय जिल्हाधिकारी व माननीय तहसीलदार यांचे अतिक्रमण हटवून तात्काळ ताबा देण्याचे स्पष्ट आदेश असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने गावकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. भूमिअभिलेख विभागाकड...
Judge reconciles broken family : न्यायधीशांनी जुळवला दुभंगलेला संसार ; पती-पत्नी एकमेकास पुष्पहारहार घालून आले एकत्र

Judge reconciles broken family : न्यायधीशांनी जुळवला दुभंगलेला संसार ; पती-पत्नी एकमेकास पुष्पहारहार घालून आले एकत्र

नांदेड, लाइफस्टाइल
कंधार (सचिन मोरे) पती अंकुश पि. शिवाजी नाईकवाडे वय २८ वर्षे (राहणार पानभोसी ता. कंधार) व पत्नी ऋतुजा भ्र. अंकुश नाईकवाडे वय २३ वर्षे (राहणार पानभोसी ता.कंधार) हा.मु. (महागाव ता. पूर्णा जि.परभणी) यांचे तू- तू मै- मै अशा शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे पेव न्यायालयापर्यंत गेले. अशा शुल्लक कारणावरून दुभंगलेला संसार जुळविण्याचे काम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.पाटील आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.के. गुज्जर यांनी मध्यस्थी करून जुळविल्यामुळे या दोन्हीही न्यायदेवतांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. हरी नारायण लेंडाळे (रा.महागाव ता.पूर्णा जि.परभणी) यांची मुलगी ऋतुजा हिचे लग्न गत ४ वर्षांपूर्वी शिवाजी नाईकवाडे (रा. पानभोसी ता.कंधार) यांचा मुलगा अंकुश नाईकवाडे यांच्याशी रीतीरिवाजा प्रमाणे विवाह झाला होता. दोघांचा संसार हा आनंदाने सुरू होता. यात त्यांना दीड वर्षाचे गोंड...
Wild animals attack : अस्मानी संकटानंतर वन्य प्राण्यांचा हल्ला; रब्बीवरील शेतकऱ्यांची शेवटची आशाही धोक्यात

Wild animals attack : अस्मानी संकटानंतर वन्य प्राण्यांचा हल्ला; रब्बीवरील शेतकऱ्यांची शेवटची आशाही धोक्यात

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| अस्मानी संकटाने आधीच खचलेला शेतकरी वर्ग आता वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पूर्णतः आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामात झालेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे मोठे नुकसान सहन केल्यानंतर रब्बी पिकांवरच शेतकऱ्यांची शेवटची आशा टिकून आहे. मात्र ही आशाही वन्य प्राणी उद्ध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे. खरीपातील तुरीचे पीक जोमात आले असून शेंगा लागल्याने वन्य प्राणी शेतात घुसून सर्रास धुडगूस घालत आहेत. तर रब्बीतील हरभरा मोठ्या प्रमाणात निघाला असताना वानरांच्या टोळ्या व हरणांचे कळप दिवसा-ढवळ्या शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पीक हातातून गेले आहे. शेतकरी दिवस-रात्र शेतात पहारा देत असूनही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसल्याने मानसिक ताण वाढत आहे. पिकांचे नुकसान झाल्यास...
Himayatnagar Rural Hospital : हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव; रुग्णांचे हाल; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

Himayatnagar Rural Hospital : हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव; रुग्णांचे हाल; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अपुरा वैद्यकीय अधिकारी व परिचारिका स्टाफ, लाखो रुपयांची आधुनिक यंत्रसामग्री बंद अवस्थेत धूळखात पडलेली आणि जवळपास दोन वर्षांपासून कोट्यवधींची नवी इमारत ताब्यात न दिल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहर व ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात; मात्र येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व पुरेसा स्टाफ नसल्याने रुग्णांना उपचाराविना परत पाठवले जात असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफीसारख्या तपासण्या उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांना खासगी दवाखान्यांकडे वळवले जा...
Air services : मराठवाड्यातील विमानसेवा तोटयात , तरीही नवीन सेवा

Air services : मराठवाड्यातील विमानसेवा तोटयात , तरीही नवीन सेवा

नांदेड, मराठवाडा, लेख
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानसेवेला मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रतिसाद आहे. तेथून विमानाने प्रवास करणारे प्रवासी दहा टक्क्यांनी कमी झाले आहेत. तरीदेखील विमान कंपन्यांनी नांदेड - मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मराठवाड्यात दळणवळणाच्या साधनेत यामुळे भर पडत आहे . परंतु भविष्यात नांदेड - मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर कदाचित ती विमानसेवा दीर्घकाळ चालेल की नाही, याबद्दल शंका आहे. एकीकडे वंदे भारत रेल्वेला नांदेडपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगर वासियांनी याबद्दल उघड उघड टीका सुरू केली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी नवीन वंदे भारत छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी सुरू करण्याची जोरदार मागणी चालविली आहे . त्यामुळे त्यांच्या या मागणीला केंद्रीय स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. असे झाले तर नांदेड...
Crop Insurance : पिकविमा ही महत्वाची योजना खासगी कंपन्यांना न देता महाराष्ट्र शासनाने स्वतः राबवावी

Crop Insurance : पिकविमा ही महत्वाची योजना खासगी कंपन्यांना न देता महाराष्ट्र शासनाने स्वतः राबवावी

नागपूर, नांदेड, राजकीय
नागपूर/हिमायतनगर, अनिल मादसवार| पीकविमा योजनेची अंमलबजावणी खासगी विमा कंपन्यांकडून काढून घेऊन ती थेट राज्य शासनानेच स्वतः राबवावी, अशी ठाम मागणी आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे केली. सध्याची पीकविमा व्यवस्था शेतकऱ्यांसाठी फायद्याऐवजी तोट्याची ठरत असून, विमा कंपन्यांच्या चुकीच्या व अन्यायकारक पद्धतींमुळे शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आमदार कोहळीकर म्हणाले की, गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीकविमा उतरविला होता. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी नुकसान टक्केवारी चुकीच्या पद्धतीने दर्शवली. परिणामी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच नाही. पूर्वी लागू असलेली ‘फोर ट्रिगर’ प्रणाली बंद करण्यात आली असून, सध्या पीक कापणीनंतर केवळ एकाच प्रयोगावर नुकसान निश्चि...
Vanchit : वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर — परस्पर गुन्हे दाखल; आरोपी अद्याप अटकेत नाहीत

Vanchit : वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर — परस्पर गुन्हे दाखल; आरोपी अद्याप अटकेत नाहीत

क्राईम, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला असून, शुक्रवारी हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. हदगाव येथील वसंत लॉजमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीदरम्यान दोन गटांत जोरदार वाद झाला. या घटनेनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून, अद्याप कोणत्याही आरोपीची अटक झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीत ‘बाहेरील हस्तक्षेप’ आणि दलालांच्या वाढत्या प्रभावामुळे असंतोष निर्माण झाला होता. निष्ठावंत कार्यकर्ते उपेक्षित राहत असून काही निवडक कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत होता. हा असंतोष अखेर शुक्रवारी उफाळून आला. हदगाव येथील वसंत लॉजमध्ये आयोजित बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते अविनाश भोसीकर व दिलीप आला राठोड उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या हिमायतन...
Mla prataprao patil chikhalikar : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन, कुस्त्या व शंकरपट स्पर्धांच्या बक्षिसांत भरीव वाढ – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

Mla prataprao patil chikhalikar : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन, कुस्त्या व शंकरपट स्पर्धांच्या बक्षिसांत भरीव वाढ – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/लोहा/माळाकोळी | दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव वाढविण्यासाठी यंदा कुस्ती, कृषी व पशुप्रदर्शन तसेच शंकरपट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला असून, कला परंपरेचे जतन व्हावे यासाठी कला महोत्सवातील कलावंतांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. माळेगाव येथे आमदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सांगितले की, तमाशा व लोकनाट्य मंडळांची संख्या वर्षागणिक कमी होत असल्याने त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा व प्रोत्साहनपर मानधन दिले जावे. यात्रेत सर्वपक्षीय नेत्यांचा सन्मान व्हावा, तसेच सुविधा पुरविताना कोणतीही उणीव राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी...
Jawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे

Jawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे

करियर, नांदेड
लोहा| तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयता सहावीसाठी जवाहर नवोदय मध्ये प्रवेश घेण्यासाठी पाच परीक्षा केंद्रावर शनिवारी (१३ डिसें) परीक्षा घेण्यात आली यात १ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी १ हजार ५५७ विद्यार्थी उपस्थित होते व ७३ विद्यार्थी अनुउपस्थित होते परीक्षा सुरळीत पार पडल्या. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली. लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात ४०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ३८२ विद्यार्थी उपस्थित होते केंद्रसचालक म्हणून शाळेचे प्राचार्य दिलीप बोधगिरे हे होते. कै विश्वनाथराव नळगे विद्यालयात ४०८ पैकी ३८७ विद्यार्थी हजर होते व २१ जण गैरहजर होते. केंद्रसचालक म्हणून मुख्याध्यापक अनिल हामदे यांनी काम पाहिले. सह्याद्री इंग्लिश स्क्रुल गोल्डन सिटी लोहा शहर या परीक्षा केंद्रावर १६६ पैकी ...
error: Content is protected !!