Thursday, May 14

पदाधिकाऱ्यांनी नव मतदार नोंदनी अभियानात हिरीरीने सहभाग घ्यावा – संदीप राठोड -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। निवडणूक आयोगातर्फे दि.२५ जुलै २०२४ पर्यंत मतदार नोंदणी अभियान चालविल्या जात आहे.

त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भाजपा युवा मोर्चाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानात हिरीरीने सहभाग घेऊन अधिकाधिक नव मतदारांच्या नावाची मतदार यादीत नोंद करावी. असे आवाहन नांदेड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप राठोड यांनी केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे नव मतदार नोंदणी अभियान राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार विधानसभा निहाय ५,००० नव मतदारांच्या नावाची मतदार यादीत नोंद करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानात आपले मोलाचे योगदान द्यावे, अशी विनंती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!