
नांदेड| महाराष्ट्र पोलीस अंतर्गत नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथक’ विशेष मोहीम राबवत आहे.



या मोहिमेअंतर्गत शहर व परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात येत आहे. यावेळी त्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करत छेडछाड किंवा कोणताही त्रास झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.


दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थांबून महिलांना व विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवरही दामिनी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत एकूण २५१ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून, १९ प्रकरणांमध्ये मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत सुमारे ₹३५,५०० दंड वसूल करण्यात आला आहे.



या मोहिमेअंतर्गत शहरातील ५० हून अधिक शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यात येणार असून, अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

नागरिक, विद्यार्थी व पालकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा छेडछाडीची घटना आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले



