उस्माननगर l उस्माननगर नियतक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजे जानापुरी शिवारातील बालाजी कदम यांच्या शेतामधुन कुत्र्याच्या तावडीतून हारणाच्या पिल्ल्याला शेतकरी आणि वनविभाग कर्मचारी यांनी सुखरूप टेळकीच्या जंगलात सोडले.


वनविभाग नियतक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नियतक्षेञ उस्माननगर अंतर्गत मौजे जानापुरी शिवारात शेतामध्ये श्री बालाजी कदम यांनी दूरध्वनी वरून असे कळवले की हरण्याचं पिल्लू आमच्याकडे आहे तरी त्याला कुत्र्याचा खेदा करीत होते. त्या कुत्र्याच्या तावडीतूनआम्ही हरणाच्या पिल्याला वाचवले आहे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केले असताना अधिकारी मा.उपवनसंरक्षक वाबळे साहेब व सहाय्यक उपसंरक्षक खेलबाडे साहेब तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रासने व वन परिमंडळ अधिकारी हकदळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक उस्मान नगर मुंडे व वाचमेन चांदोबा भिसे यांनी हरणाचे पिल्लू ताब्यात घेऊन जाऊन सुरक्षित ठिकाणी मोजे टेळकी येथील जंगलामध्ये सुरक्षितपणे सोडण्यात आले.


