उस्माननगर l येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत त्यामुळे पाच वर्ष झोपेत असलेले अनेक पुढारी आता गावोगावी भटकत असून काही भावी उमेदवार लोक रस्त्यावर मुरूम टाकत आहेत काही ठिकाणी चढाओढी करून पट्टी देत आहेत मात्र कुणी मुरुम टाका की, डांबर विकास करण्यासाठी कंधार लोह्याला लागतो फक्त चिखलीकर असे म्हणत आमदार चिखलीकर यांनी विरोधकांची खिल्ली उडवत टीका केली.


मारतळा (ता.लोहा) येथे शुक्रवारी (दि.७) रोजी त्रिविक्रम हॉटेलचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती प्रविण पाटील, बालाजी पाटील, आनंदराव शिंदे, शंकरराव ढगे, माजी जि.प.स.गणेश सावळे, सुभाष गायकवाड, सचिन चिखलीकर, गणेश उबाळे , गोविंद जाधव, सरपंच बाळू भरकडे, सुरेश पाटील.शिवराज पाटील.कोंडीबा पाटील.प्रभाकर ढाले. बाबुराव कपाळे.भगवान सोमवारे, केशव ढेपे, संदिप ढेपे, सुमेध गजभारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की येणारी पिढी ही हॉटेलात खाणारी आहे. ग्राहकांना योग्य उत्तम जेवण आणि सन्मानाची वागणूक दिल्यास नक्कीच हॉटेल व्यवसाय वाढून, नाव लौकीक होईल.


महिलांच्या सुरक्षेची दखल देखील प्रामुख्याने घ्यावी असे ते म्हणाले.त्रिविक्रम हॉटेल चालकांनी. उध्दघाटनाची वेळ योग्य साधली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असल्याने मोठा व्यवसाय होवो अशा शुभेच्छा देत. विरोधकांचे चिमटे काढत कुणाचे नाव न घेता.

पाचव्या वर्षी का होईना जनता व कार्यकर्त्यासाठी वेळ ते काढतात त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या सेवा घ्या असे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मारतळा येथे उध्दघाटन प्रसंगी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आमदार चिखलीकर यांचा आयोजकांच्या वतीने मोठ्या पुष्फराने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रामराव ढेपे यांनी तर सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले यावेळी उमरा सर्कल मधील अनेक गावातील कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती..

