नांदेड| मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यतः मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे केळी सह फळबाग व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना मुख्यानेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नामदार हेमंत पाटील यांनी केली.


नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे,पशूंचे नुकसान झाले आहे .यामध्ये प्रामुख्याने केळी बागा जमीनदोस्त झाल्याने केळीच्या दरात घसरण झाली असून ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.तसेच नदी नालयांना पूर येऊन शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी झाली आहे.

त्यामुळेअतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी नामदार हेमंत पाटील यांच्यासह आमदार कोहळीकर व आमदार बोंढारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्या समवेत हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर,आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांची उपस्थिती होती.





