Sanjay Warkad ; भगवान बिरसा मुंडे यांचा तरुणांनी आदर्श घ्यावा तहसीलदार संजय वारकड
उस्माननगर l आपल्या देशाची भूमी ही वीरांची भूमी असून संत ज्ञानेश्वर , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , व भगवान बिरसा मुंडे यांनी अवघ्या पंचवीस वर्षात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात झोकून देऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडले तसेच जल , जंगल , जमीन , हक्क अबाधित राहुन आदिवासी संस्कृतीसाठी संरक्षण व्हावे यासाठी बहुमोल कार्य केले,त्यांचा आदर्श तरूणांनी घ्यावे असे प्रतिपादन नांदेड येथील तहसीलदार संजय वारकड यांनी तेलंगवाडी येथील भगवान बिरसा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले.
देशाचे महान क्रांतिकारक ,जनजातीय अस्मिता व संस्कृती रक्षणासाठी इंग्रजी राजवटी विरोधात बंड पुकारणारे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती तेलंगवाडी ता.कंधार येथे गावक-यांच्या वतिने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस श्री संजय वारकड तहसीलदार नांदेड,अक्षय सुक्रे गटविकास अधिकारी व माजी सरपंच श्री सुरेश मामा बास्टे...
