मराठवाडा शेवटी कोणाचा…?
मराठवाड्याने लोकसभेच्या निवडणुकीतून भाजपला धक्काच दिला आहे. 'भाजपचा गड' अशी आगेकूच करणाऱ्या मराठवाड्याने भाजपचा एकही उमेदवार निवडून दिला नाही. ही परिस्थिती मराठवाड्यावर का आली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघातून तिघे काँग्रेसचे तर अन्य तिघे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व एक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे व बीडचे खासदार शरद पवार यांच्या गटाचे निवडून आले.
मराठवाड्यातील मतदार नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज नाही. मराठवाड्यात त्यांच्या झालेल्या सभांना चांगल्याच प्रतिसाद होता . त्याचबरोबर अमित शाह यांनी घेतलेल्या प्रचार सभा ही चर्चेत राहिल्या. कलम ३७०, राम मंदिर , ट्रिपल तलाक या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना मराठवाड्यातील जनतेचाही पाठिंबा होता. मग असे काय घडले ज्यामुळे मराठवाड्यातून भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही? यावर चर्चा केली तेवढी क...
