Prajnadhar Dhawale : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यक – प्रज्ञाधर ढवळे -NNL
नांदेड| निवडणूक हा लोकाशाहीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. भारतीय संविधानाने दिलेला मताधिकार निवडणुकीत वापरून लोकशाही बळकट केली पाहिजे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यकच असल्याचे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. ते शहरातील खडकपुरा परिसरात 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथवाचन समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी भदंत शिलरत्न थेरो, सामाजिक कार्यकर्ते भगवान येवले, लाॅर्ड बुद्धा टीव्ही प्रतिनिधी सदाशिव गच्चे, हिरामण पंडित, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ग्रंथवाचक अनिल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उपासक प्रकाश मस्के हे होते.
शहरातील वजिराबाद खडकपूरा परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण सोसायटीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे वाचन समारोप सोहळा संपन्न झाला....
