MLA Pratap Patil Chikhlikar : जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्या – आमदार प्रताप पाटील चिखलीकर
उस्माननगर, माणिक भिसे| जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यानी केले. एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमा अंतर्गत ग्राम दरबार या कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ रोजी मारतळा ता. लोहा येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की जल जीवन मिशन योजनेचे काम एकदा झाल्यावर किमान वीस पंचवीस वर्ष तरी पाणी पुरवठ्याचे काम त्या गावात होणार नाही. त्यामुळे आताच त्या कामावर ग्रामस्थांनी लक्ष देऊन ती काम दर्जेदार पद्धतीचे करून घ्यावे. कोणत्याही गावात निकृष्ट काम होत असल्यास विरोधक असो की सत्ताधारी यांनी माझ्याकडे ताडतोब तक्रार द्या संबंधित अधिकारी आणि गुतेदारावर कारवाई केली जाईल. या कामात हलगर्जी करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर तहसिलदार विठ्ठल परळीकर, बीडीओ डी के आडेराघो, माजी आमद...
