Friday, May 15

Tag: The need of the hour is to implement

तंटामुक्त गाव समिती व सरपंचांनी “एक गाव एक गणपती” उपक्रम राबविण्याची काळाची गरज -NNL

तंटामुक्त गाव समिती व सरपंचांनी “एक गाव एक गणपती” उपक्रम राबविण्याची काळाची गरज -NNL

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे। एकाच गावात अनेक गणपती स्थापन करून शांतता नष्ट करण्यापेक्षा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व सरपंचांनी पुढाऱ्यांनी "एक गाव एक गणपती " हा स्तुत्य उपक्रम टिकविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची आज काळाची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर आर पाटील यांनी १५ऑगस्ट २००७ पासून महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये समाजातील सर्व घटकातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला. तेव्हा प्रत्येक गावातील समितीच्या अध्यक्षांनी , पदाधिकारी व प्रथम नागरिक म्हणून ज्यांचेकडे पाहिले जाते असे सरपंचांनी , सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविल्यास गावातील सर्व नागरिक एका ठिकाणी जमा होतील. अनेका...
error: Content is protected !!