Swami Govind Devgiriji Maharaj : समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल ! – प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) - केवळ जप करत बसलो, तर काम होणार नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, ‘माझे स्मरण कर पण युद्ध कर !’ स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे आपल्या देशावर काळ्या इंग्रजांची सत्ता होती. आपला देश धर्मशाळा बनला आहे. आता समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या आड येणार्या कायद्यांमध्ये पालट करून देशात कोणते कायदे हवेत, यावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधना, ईश्वराची उपासना आहे. आपण आपल्या व्यक्तीत्वाची बाजी लावून आणि संघटित होऊन परमात्म्याच्या सेवेत स्वतःला अर्पण केले पाहिजे. तर स्वर्णिम काळ दूर नाही, असे मार्गदर्शन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी केले. या वेळी देशविदेशातील २० हजारांहून अधिक हिंदू उपस्थित होते.
सना...
