Ghagar morcha ; रामजी आंबेडकर नगरात कृत्रिम पाणी टंचाई – नागरिकांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा -NNL
नांदेड| लोहा तालुक्यातील उमरा येथील नवीन वस्ती असलेल्या रामजी आंबेडकर नगर येथे भर पावसाळ्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे गेल्या पंधरा दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून पाणी पुरवठा लवकर सुरळीत करून देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील उमरा हे सर्कलचे गाव आहे. तसेच पाच तांडे मिळून येथे गट ग्रामपंचायत असल्याने या गावासाठी शासनाचा मोठा निधी येतो मात्र म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यातच भर पावसाळ्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे नवीन वस्ती असलेल्या रामजी आंबेडकर नगरात गेल्या पंधरा दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
या बाबतीत गेल्या आठ दिवसांपूर्वी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून बोअरची मोटार जळाली असून ती पूर्ववत करून आमची पाण्याची समस्...
