Nanded : नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्घाटन; १२५ स्टॉलमधून कृषी उत्पादने व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन
नांदेड | नांदेड येथे तीन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर १५ ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात १२५ विविध स्टॉल उभारण्यात आले असून कृषी उत्पादने, तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग आणि सेंद्रीय उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
उद्घाटन प्रसंगी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा अन्नदाता असल्याचे सांगितले. उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असून शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)सारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस मदत होईल, असे त्यांनी सांगितले. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून नुकत्याच जाहीर झालेल...
