Degree under ‘AEDP’ : ‘एईडीपी’ अंतर्गत पदवी म्हणजे उज्वल भविष्य – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
नांदेड| आजच्या युगात पदवी पेक्षा कौशल्याला जास्त महत्त्व आहे. त्यामध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी संबंधित उद्योग जगतात प्रत्यक्षात प्रशिक्षण घेतले तर कित्येक पटीने चांगले. एईडीपी (व्यावसायाधिष्ठित पदवी अभ्यासक्रम) या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच कौशल्य आधारित पिढी घडविणे असा आहे. त्यामुळे निश्चितच एईडीपी अंतर्गत घेतलेली पदवी म्हणजे उज्वल असे भविष्य आहे, असे मत कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते आज दि.४ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील आधीसभा सभागृहात एईडीपी अंतर्गत सुरू केलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात बोलत होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन, राज्य एईडीपी समितीचे अध्यक्ष डॉ भारत अमाळकर, एईडीपी प...
