Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती दिन आणि विस्मृतीतील जनआंदोलन
17 सप्टेंबर – मराठवाडा मुक्ती दिन, ही केवळ एक तारखेची नोंद नाही, तर ती मराठवाड्यातील जनतेच्या शौर्य, त्याग आणि अस्मितेचा ऐतिहासिक ठसा आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले, पण मराठवाडा भाग मात्र हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीखाली अडकलेला होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सामील झाले आणि मराठवाड्याला खरी स्वातंत्र्याची अनुभूती मिळाली.
मराठवाडा मुक्ती संग्राम : जनतेचा लढा - हा लढा फक्त काही नेत्यांनी किंवा संस्थांनी दिलेला नव्हता. हा जनतेचा लढा होता, रजाकारांच्या अत्याचाराच्या विरोधात उभा ठाकलेला हिंदू समाजाचा लढा होता. या लढ्याला ठोस नेतृत्व नव्हते, पण त्यात सामान्य माणसाचा असाधारण सहभाग होता. शेकडो गावांमध्ये भूमिगत चळवळी, सशस्त्र संघर्ष, गुप्त बैठका आणि प्रचार याच्या माध्यमातून जनता संघटित झाली होती. जर ही चळवळ, हे युद्ध...
