Mla Chikhalikar ; लोहा -कंधार तालुका कृषी विभागाने प्रशासनात सुधारणा करावी – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर
लोहा। लोहा -कंधार तालुका कृषी विभागाच्या गेल्या पाच वर्षात प्रचंड मरगळ आली आहे. दौऱ्याच्या नावाखाली कार्यालय कोणीच वेळेवर उपस्थित राहत नाहीत. शेतकऱ्यांना शेती बांधावर जाऊन मार्गदर्शन करत नाहीत. त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळून देण्यात परिपूर्णता नाही. माती परीक्षण , पीक उत्पादन वाढीसाठी उपाययोजना केल्या जात नाहीत .बियाणे उगवले नाही किंवा पिकांना फळधारणा झाली नाहीत तर त्या संबधित कंपनीवर कार्यवाही होत नाही आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली जात नाही. खत टंचाई निवारण वेळीच नाही .दोन्ही अधिकारी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचे काम असमाधानकारक असून यापुढे त्यात सुधारणा व्हावी अन्यथा कार्यवाहिला सामोरे जावे लागेल ,शेतकऱ्यांची हेळसांड सहन केली जाणार नाही. या भाषेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कृषी विभागाचे खरडपट्टी काढली.
लोहा व कंधार तालुका कृषी विभागाची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आमदार प...
