Kinwat ; किनवट जिल्हा घोषित करून इस्लापूर मांडवी तालुके घोषित करावी किनवटवासीयांची मागणी – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l नांदेड जिल्ह्याच्या टोकापासून तब्बल 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट तालुका ची निर्मिती जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 30 वर्षापासून सातत्याने पत्रकार संघाच्या माध्यमातून व या भागातील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता. पण शासनाने या जिल्हा निर्मिती संदर्भात कुठलीही दखल घेतली नाही.
नव्यानेच महाराष्ट्रामध्ये बहुतांशी जिल्ह्याची विभाजन करून नवीन जिल्ह्याची निर्मिती येत्या 26 जानेवारीला होणार असल्याने पुन्हा एकदा किनवटवासीयाच्या अपेक्षा पल्लवीत झाल्यात. यावेळेस होणाऱ्या जिल्हा निर्मिती संदर्भात नुकताच उदगीरचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध होते.
पण किनवट जिल्हा निर्मिती संदर्भात शासन स्तरावरून कुठल्याही हालचालीना वेग मिळत नाही.त्यातच पिपळशेंडा अप्पारावपेठ ही गाव...
