आरडीसी किरण आंबेकर यांच्या आश्वासना नंतर जनवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपोषण सोडले
नांदेड l शहरातील अनुदानापासून वंचीत राहिलेल्या पूरग्रस्तांच्या व इतर प्रलंबीत मागण्यासाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तथा राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ.लता गायकवाड आणि कॉ.प्रेमला पतंगे यांनी दि. ९ डिसेंबर रोजी मनपा, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करून आमरण उपोषणाची सुरवात केली होती.
राहिलेल्या पूरग्रस्तांचे पंचनामे महापालिकेने तात्काळ तहसील कार्यालयास पाठवावेत व सानुग्रह अनुदान पीडित पूरग्रस्तांना देण्यात यावे.ही प्रमुख मागणी उपोषणार्थीची होती. उपरोक्त मागणीसाठी सीटू आणि जमसं च्या वतीने ५५ आंदोलने करण्यात आली आहेत.
परंतु मागण्याची दखल मनपा आयुक्त घेत नसल्याने शेवटी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणास सुरवात केली होती. माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे मागील ५५ ते ६० वर्षात नवीन प्लॉट्स पाडण्यात आले नसल्याने गावातील अनेक कुटुंबी...
