Mp. Dr. Ajit Gopchade : कृषी उत्पादन क्षमता वाढीसाठी शेतकर्यांना जल-वायु अनुकूल कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणे गरजेचे -NNL
नवी दिल्ली| शेतकर्यांच्या दैनंदिन कामात सुधारणा घडवून कृषी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जलवायु अनुकूल कृषि तंत्रांचे शेतकर्यांना समर्पक प्रशिक्षण दिले जाणे अत्यावश्यक असून त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत खा. डॉ.अजित गोपछडे यांनी सभागृहात मांडले.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) च्या संशोधनविषयक चर्चेत सहभाग घेताना खा.डॉ.अजित गोपछडे यांनी स्पष्ट केले की,आयसीएआरच्या माध्यमातून शेतकर्यांच्या हितासाठी सरकारकडून घेतले जाणारे हे पाऊल, ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा निर्माण करेल आणि भारतीय कृषि क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यास मदत होईल. यावेळी खा.डॉ.गोपछडे यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी सांगितले की, भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) च्या संशोधन प्रयत्नांना सुधारण्यासाठी ...
