तालुक्यात गुटखा तस्करी जोमात पण अन्न प्रशासन विभाग मात्र कोमात; अर्थपूर्ण व्यवहारामुळे कार्यवाही मात्र शून्य -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र शासनाने केलेली गुटखाबंदी ही कागदपत्रीच किनवट आदिवासी व दुर्गम भागाचा फायदा घेऊन तालुक्यातील सारखणी बोधडी,इस्लापूर, शिवनी, ही मुख्य व्यापार पेठेशी संबंधित असलेली मोठी गावे आता गुटखा तस्करीचे केंद्रबिंदू बनले आहेत . संबंधित गुटखा तस्करीचे धागेदोरे हिमायतनगर तालुक्यातील एका बलाढ्य व्यावसायिकाचे असल्याचे बोलले जाते.
या सर्व बाबीकडे अन्न प्रशासन विभाग मात्र झोपेचं सोंग घेऊनही बघ्याची भूमिका घेत आहे. शासनाने गुटखा,, केमिकल मिश्रित अन्नधान्य अनेक घातक पदार्थाला आळा बसावा यासाठी प्रशासनाची अन्न भेसळ यंत्रणा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हि यंत्रणा कार्यान्वित केली आहेत. पण अनेक दिवसापासून गुटखा, तस्करीचे व्यवसाय चालू आहेत. अनेक वृत्तपत्रातून वृत्तही प्रकाशित झाले. तरी संबंधित प्रशासन झोपेचे सोंग का घेतंय ? यावर कधीच मोठी कार्यवाही का होत नाही? हे न उलगडणार को...
