Get togethar : माजी विद्यार्थ्यांनी 30 वर्षानंतर दिला जुन्या आठवणींना उजाळा, शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| संवगडी, शाळेचा वर्ग, शिक्षक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करुन असते. ति बालपणीची शाळा सोडून ३० वर्ष झालेल्या विद्यार्थी नि पुन्हा त्याच वर्ग खोलीत बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वांरवार येतेच. म्हणुनच श्री जगदंबा हायस्कूल माहूर येथील १९९४-९५ च्या बॅच चे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३० वर्षां पुर्वीची शाळेतील मस्ती, एकत्रीतपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंम्मेलने व सांस्कृतीक कार्यक्रमाची धुम इत्यादी विषयावर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत ओघातच आपण इतके मोठे झालो याचे क्षणभर विस्मरण झाले.
विद्यार्थ्यांचे शालेय जीवन हे त्यांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात कालांतराने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटा धराव्या लागतात आणि आपले आवडते शिक्षक मित...
