सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करुनच वापरावे – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे -NNL
नांदेड| येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता चाचणी करुनच बियाणे वापरावे. तसेच स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षापर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबीजोत्पादन, पिक प्रात्याक्षिके योजना अंतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.
प्रमाणीत बियाण्यांपास...
