Virasaiva-Lingayat Sampraday ; विरशैव -लिंगायत सांप्रदायात दीक्षा संस्कार महत्वाचा; युवासंत दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन हजारों भाविकांनी घेतली दिक्षा
उस्माननगर, माणिक भिसे l वीरशैव -लिंगायत पंथात दीक्षा हे प्रमुख संस्कार आहे हा संस्कार म्हणजे गुरु शिष्याला श्रद्धेची गाठ म्हणतात. गुरु शिष्याचे नाते निर्माण करण्याचा हा संस्कार आहे त्यात गुरुच्या अज्ञेचे पालन करणे, लिंगाची पूजा करणे जंगम किंवा वीरशैव भक्ती मुकुट परिधान करणे पवित्र रूद्रांचा जप करणे, शिवाला समवर्तीत केलेल्या पवित्र राखेचा भस्म विभूती धारण करणे, गुरूकडून प्रसाद स्वीकारणे , पवित्र पाण्याचे शुद्धीकरण करणे, वीर शेव धर्मात शिवा ची पूजा करणे वीरशैव पंथात लिंग गळ्यात परिधान करणे.
त्या शिवा ची आयुष्यभर पूजा करणे ही तत्व वीर शैव सांप्रदायांनी अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहेत असे प्रतिपादन दीक्षा शिवरात्र प्रदोष गुरु मंत्र आदी कार्यक्रमाच्या अनुषंगाने वीरशैव -लिंगायत सांप्रदायाचे तथा युवकांचे प्रेरणा स्तोत्र युवा संत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी सिद्धेश्वर मंदिर येथे ...
