Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज
लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून ती एक सुसंस्कृत, जबाबदार आणि संवेदनशील सामाजिक व्यवस्था आहे. ही व्यवस्था टिकवण्यासाठी आणि अधिक सक्षम करण्यासाठी तिचे चारही आधारस्तंभ भक्कम, निस्पृह आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे वृत्तपत्र व माध्यमे—हे चारही स्तंभ एकमेकांना पूरक ठरून लोकशाहीला स्थैर्य देतात. परंतु आज प्रश्न असा निर्माण होतो की, हे आधारस्तंभ खरोखरच मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? आणि नसतील, तर त्याची जबाबदारी कोणाची?
लोकशाही मजबूत करण्यासाठी तिच्या मुळाशी असलेले मूल्यसंवर्धन महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने शासन, संस्था, संघटना आणि समाजातील नेतृत्व करणारे घटक यांनी तटस्थपणे, दूरदृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र वास्तव पाहता, विशेषतः चौथ्या आधारस्तंभाबाबत हे प्रयत्न अपुर...

