Collector Abhijit Raut sent Maharakhi : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते महाराखी, राख्या व सदिच्छापत्र सीमेकडे रवाना – NNL
नांदेड| आपल्या प्राणप्रिय भारत मातेचे सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या भारतीय वीर सैनिकांना मन्याड-गोदावरी खोऱ्यातील शालेय भगींनीच्या ३३३३ राख्या व सदिच्छापत्र सोबत १५ फुटाची विशालकाय महाराखी रक्षाबंधन सणाच्या निमित्य गेल्या ११ वर्षापासून अखंडित मन्याड व गोदावरी खोऱ्यातील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार आणि राष्ट्रप्रेमी टीमच्या वतीने २६२ फिल्ड रेजिमेंट सहित १४ बटालियनला पाठवण्याचे कार्य अविरत सुरु आहे.
गेली १० वर्ष पोलीस ठाणे कंधार येथुन पाठविण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत साहेब यांनी दि.०६ ऑगस्ट २०२४ रोजी ११ वेळ दिला. जिल्हाधिकारी साहेब यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील कारगील युद्धात भारतीय जांबाज शूर सैनिकांनी युध्दात बजावलेल्या असीम शौर्याचे वर्तमान पत्रात येणारे छायाचित्रणाचे कात्रण संकलन करून भारतीय सैनिकाप्रतिचे प्रेम अनोख्या पध्दतीने व्यक्त करणाऱ्...
