Mp. Ravindra Chavan : कै वसंतराव चव्हाणांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणार – खा. रवींद्र चव्हाण
देगलूर, गंगाधर मठवाले| नांदेड जिल्ह्यातील मोठे मोठे नेते काँग्रेस सोडून गेल्याने खासदारकिची निवडणूक लढण्यासाठी कोणताही नेता तयार नव्हता. मी सामान्य जनतेच्या भरवशावर निवडणूक मैदानात उतरलो आणि जिंकलो. त्यामुळे नांदेड जिल्हाचा विकास करण्यासाठी जे स्वप्न कै. वसंतराव चव्हाणांनी पाहिल ते स्वप्न मी साकार करणार असल्याचे प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर वासियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाल उत्तर देताना बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, शेतकऱ्यासाठी संसदेत बोलताना सोयाबीनवर प्रकिया केंद्र उभारल्यास शेतकऱ्याना भाव जास्त येतो आणि तरुणांच्या हाताला देखील काम मिळते. तसेच कासराळी येथे शासकीय जमीन जास्तीतजास्त असल्याने मिरची केंद्र उभारावे यासाठी देखील पाठपुरावा केला. शेतकऱ्याच्या पिक विमासाठी दिल्लीच्या संसद मधे आवाज उठवून शंभ...
