Roadblock : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मदतीसाठी रास्ता रोको
उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील मन्याड नदीखोऱ्यातील बारूळ , कौठा व नदीकाठावरील गावावर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका दिवसात २७५ मिलिमिटर पाऊस पडला. हा पाऊस शासकीय नुकसान निकषाच्या तीन पट जास्त आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. नदिकाठावरील तसेच ओढ्या नाल्या शेजारील शेतीचे पण अतोनात नुकसान झाले. हे नुकसान सहन करण्याची क्षमता ना... शेतीची आहे ना... शेतकऱ्यांची अशा आपतीच्या काळात सरकार मदत करू शकते परंतु त्यावरही खूप बंधन आहेत.
एन.डी.आर.एफ. चे प्रचलित निकष हे फारच तोडके आहेत. त्यामुळे एका विशेष आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने १) खरडून गेलेल्या शेतीसाठी हेक्टरी १ लाख रपये, पुरबाधित शेतीसाठी हेक्टरी ५०हजार रूपये , अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीसाठी हेक्टरी ३० हजार रूपये अशा स्वरूपाची मदत तात्काळ करण्यात यावी. 2) या नैसर्गिक आपतिमध्ये शेतकरी त्यांच्याक...
