Ramdas Patil Mitra Parivar ; संकटात उमटलेला आशेचा किरण – रामदास पाटील मित्र परिवाराचे अनुकरणीय कार्य
देगलूर, गंगाधर मठवाले l आभाळ कोसळले, नद्या तुडुंब वाहिल्या, शेतमाल वाहून गेला, घरे उद्ध्वस्त झाली. हसनाळ, रावणगांव, भिंगोली, भेंडेगाव, मारजवाडी, रावी, सावळी आदी गावांत प्रत्येक कुटुंबाच्या संसारावर आपत्तीचे सावट दाटून आले. अश्रूंनी डोळे भरून गेले, रिकाम्या हातांनी माणूस हतबल झाला. अशा वेळी जेव्हा आधाराची आस लागली होती, तेव्हा धावून आलेले हात होते रामदास पाटील मित्र परिवाराचे.
संकट कितीही मोठं असो, मग ते कोरोना असो की अतिवृष्टीचे प्रचंड संकट या मित्र परिवाराने सेवा भावाचा मार्ग कधीच सोडला नाही. दिवस-रात्र झटत त्यांनी प्रत्येक गावात पोहोचून गरजूंच्या ओठांवर दिलासा उमटवला. कुठे अन्नधान्यकिट पोहोचवले, कुठे तांदूळ, तेल व आवश्यक साहित्य दिलं, तर कुठे खिचडी शिजवून शेकडो लोकांच्या हातात गरम थाळी दिली. रावी गावात पन्नासहून अधिक कुटुंबांना आधार दिला, तर हसनाळ, रावणगाव व परिसरातील जवळपास 400 कुटुं...
