Co. Arjun Ade : “अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० रु. हजार मदत जाहीर करा” – काॅ.अर्जुन आडे -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| अखिल भारतीय किसान सभा किनवट तालुका कमिटीच्या वतीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी बाबद आज दि.४ सप्टेंबर रोजी किनवट तहसिल येथे निवेदण देण्यात आले. किनवट तालुक्याच्या सर्वच मंडळात गेल्या चार-पाच दिवसापासून प्रचंड पावसाने थैमान घातले असुन शेती पिके उध्वस्त होऊन धोक्यात आली आहे.
हातात तोंडाला आलेलेसोयाबीन ,कापूस ,मूग,उडीद, मका इत्यादी शेती पिके अतिवृष्टीच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालेली आहे. नदी नाल्यालगतच्या शेती संपूर्णपणे खरडून निघाल्याने पिके वाहून गेली आहे अशा अवघड वेळी शासन आणि प्रशासन स्तरावरून तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता असुन तातडीने विनाविलंब पंचनामे करुन हक्टरी ५० हजार जाहीर करावे असे मत निवेदण सादर करतांना किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.
निवेदनात अतिव्रष्टीच्या अनुशंगाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हे...
