नांदेड| “शिक्षणावर आधारित तंत्रज्ञानाचा प्रभाव : एक अभ्यास” या विषयावरील शोधनिबंधाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. हा अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक शोधनिबंध डॉ. एन. बी. भारती यांनी सादर केला असून, या यशामुळे सदर शोधनिबंधाची थेट राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ही बाब शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे.


डॉ. एन. बी. भारती यांनी आपल्या शोधनिबंधातून आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रक्रियेवर होणारा सकारात्मक व परिणामकारक प्रभाव सखोलपणे मांडला आहे. डिजिटल साधने, माहिती-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑनलाईन शिक्षण पद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत होणारे बदल यांचा त्यांनी शास्त्रीय व संशोधनात्मक पद्धतीने अभ्यास केला आहे. सध्याच्या शैक्षणिक परिवर्तनाच्या काळात हा शोधनिबंध मार्गदर्शक ठरणारा असल्याचे मत परीक्षकांनी व्यक्त केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन भारती यांनी डॉ. एन. बी. भारती यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक एस. एल. सूर्यवंशी यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. विद्यालयातील पी. व्ही. राऊत, के. एस. निलेवार, ओमप्रकाश चिद्रावार, निकेतन भारती, रवि वायकुळे, चंद्रकांत डाखोरे, नंदकिशोर जगताप व अमोल मोरे यांनीही डॉ. भारती यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



