हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील पत्रकार दयानंद कदम हे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.


अत्यंत मण मिळावू मृदभाषी अभ्यासूवृती पत्रकार मित्र मंडळात ते लोकप्रिय होते. विविध सामाजिक संघटनाद्वारे पत्रकारांच्या अडचणीत धावून येण्याचे ते कार्यरत होते. त्यांनी विविध वर्तमानपत्रात काम केले असून त्यांच्या मागे चार मुली पत्नी भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारांचा आधारवड हरवला आहे.



