किनवट,परमेश्वर पेशवे| रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. जर केलं नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. शिवाय कार्डही अॅक्टिवेट राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही केवायसी केलं नसेल तर आताच रेशन दुकानावर जाऊन किंवा तहसील कार्यालयातील ई-केवायसी सुविधा केंद्रावर जाऊन तुमचं केवायसी करून घ्या,असे आवाहन तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांनी केले आहे.


ई-केवायसी का आवश्यक आहे?
ई-केवायसीमुळे रेशन कार्डधारकांची माहिती सरकारला मिळते. तसेच, रेशन कार्ड योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार टाळता येतो. रेशन कार्डवर कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

ई-केवायसी कशी करावी?
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही खालील पद्धतीने ई-केवायसी करू शकता:
ऑनलाईन: घरी बसून तुम्ही ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकता.
जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता.
रेशन दुकानदार: तुमच्या रेशन दुकानदाराच्या मदतीने तुम्ही ई-केवायसी करू शकता.
ई-केवायसीसाठी काय आवश्यक आहे?
रेशन कार्ड, कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा

ई-केवायसीचे फायदे
फसवणूक रोखली जाते: रेशन कार्डचा वापर फक्त योग्य व्यक्तीच करतात, हे सुनिश्चित होतं.माहितीची अचूकता: रेशन कार्डधारकांची माहिती अपडेटेड आणि अचूक राहते.
सोपी प्रक्रिया: ऑनलाईन प्रक्रिया सोपी आणि जलद आहे.
पारदर्शकता: ई-केवायसीमुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहते.

२८ फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी करा!
किनवट तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना २८ फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी करण्याचे आवाहन तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अंतिम तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होऊ शकतं,असे तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.