किनवट, परमेश्वर पेशवे| बदलत्या हवामानानुसार कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण अशा या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी दोन हात करताना पहिलाच शेतकरी पहिलाच हतबल झाला असता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती मध्ये सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र किनवट तालुक्यातील तोटंबा (sudden stoppage of fuel bore water) या भागात पहावयास मिळत आहे.

किनवट तालुक्याच्या मानसिंग नाईक तोटंबा परिसरात अचानक जमिनीतील पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने या गावातील बहुतांश इधन बोर कोरडे पडले आहेत त्यामुळे मका ज्वारी गहू ही नगदी पिके मोठ्या प्रमाणात वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील इंधन बोर नेहमीच मे महिन्यापर्यंत परिपूर्ण चालत होते आणि या इंधनबोरच्या माध्यमातूनच शेतकरी गहू मका ज्वारी ही नगदी पिके घेवून लाखो रुपयाचे उत्पन्न घेत होते.

मात्र फेब्रुवारी महिन्यातच येथील बहुतांश इंधन बोरचे पाणी अचानक गायब झाल्याने मका ज्वारी गहू ही उभे पिके जशास तशी वाळून गेली आहेत त्यामुळे हातात तोंडाला आलेली पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती येथील सरपंच प्रतिनिधी डी के जाधव यांनी ही माहिती दिली.


या भागातील लक्ष्मण खिरू राठोड माजी सरपंच. प्रेमसिंग धूपसिंग राठोड, चंपत खिरु राठोड, रोहन देवराव जाधव, वसंत गणपत राठोड, साईनाथ सुंदर राठोड, धीरज प्रेमसिंग राठोड, संतोष नाजम चव्हाण, मोहन देवराव जाधव, अंकुश खातराव राठोड, जयवंत चोखला राठोड, रोहन देवराव जाधव, विकास सखाराम जाधव, यांच्या सह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील इंधनबोर अचानक कोरडे पडल्याने या शेतकऱ्यांच्या शेतातील शेकडो एकर वरील मका ज्वारी गहू ही नगदी पिके वाळून गेली आहेत.

त्यामुळे महसूल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बांधावर येऊन वाळलेल्या पिकाचे पंचनामे करून रब्बी पीक विम्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यासाठी रब्बी पिक विमा उतरवलेल्या कंपनीला नुकसान भरपाई चा अहवाल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यातून होत आहे.

