They don’t ask for water : पाण्यासाठी विचारत नाही जाब.. म्हणून उस्माननगरला मिळत नाही पाणीपुरवठा योजनेचा लाभ
उस्माननगर, माणिक भिसे| मागील अनेक वर्षापासून उस्माननगर ता.कंधार येथे दरवर्षी येथील नागरिकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, मागील तिव्र पाणीटंचाईच्या काळात सहा जणांचा बळी गेला होता. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे जिवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर केली पण या योजनेतंर्गत गावकऱ्यांना तहान भागली नाही. अनेक महीन्यापासून सदरील योजना बंध पडल्यामुळे व बोअर, विहिर ,आड,हातपंप यांना पाणी येत नसल्याने नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागते,. गोरगरिब जनता मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे .कोन्ही पाण्यासाठी विचारत नाही जाब म्हणून उस्माननगर ला मिळत नाही पाणीपुरवठा योजनेचा लाभ .
उस्माननगर हे कंधार तालूक्यातील सर्वात मोठे व बाजारपेठेचे गाव आहे. येथे दरवर्षी भिषण पाणी टंचाईचा सामना नागरिक करावा लागतो. लाखो रुपये टॅकरने पाणीपुरवठा करून खर्च शासनाने केल...
