heavy rains and floods : अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी -NNL
नांदेड, अनिल मादसवार| अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेती पिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शासनाने आपतग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नांदेड, हिगोली जिल्हयात अनेक ठिकाणी अतीवृष्टी आणिपूरग्रस्त भागाच्या पाहणी नंतर केली.
मागच्या तीन-चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेती पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. चांगल्या भरात असलेले सोयाबीन, काढणीस आलेला मुग, उडीद, तसेच तुर, हायब्रीड ज्वारी ऊस, केळी यासह इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी माती वाहून गेल्याने जमीन नापीक बनली आहे. अतीवृष्टीने नंतर आलेल्या पुरामुळे अनेक शहरात व गावात पाणी घुसल्याने घरांची पडझड झाली आहे. जीवनावश्यक वस्तुची नासाडी झाली आहे. अनेक परिवारांच्या समोर उपजिविकेचा...
