Teachers should be recruited based on merit | टी.ई.टी.परिक्षा बंद करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| टी.ई.टी.परिक्षेतील यापूर्वीचे घोटाळे पाहता पात्र व गरिब विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नये म्हणून हि परिक्षाच बंद करावी अशी मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक अध्यक्ष सिध्दार्थ तलवारे यांनी राज्याच्या शिक्षण सचिवा सह, शिक्षण आयुक्ताकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात तलवारे यांनी म्हटले आहे की,टी.ई.टी.परिक्षा घोटाळ्यात आय.ए.एस.अधिकारी सुशील खोडवेकर, परिक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह पन्नास च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांना तुरुंगात जावे लागले होते.नंतर हे सर्वजण जमानतीवर सुटले व त्यांना पुन्हा मुळ पदांवर आस्थापना देण्यात आली.
सद्या नीट परिक्षेचा मुद्दा देशभरात गाजत आहे.कोणत्याही पात्रता परीक्षेत घोटाळा हा जणू ठरलेलाच आहे असे समीकरण झाले आहे.सद्या शासन शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत जी माहिती देत आहे त्यात प्रचंड तफावत आहे.नव्याने टी.ई.टी.व्दारे...
