Shahaji Umap : शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्यात भर; अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात शहाजी उमाप यांचे प्रतिपादन -NNL
अर्धापूर| शिक्षण हे माणसाचे जीवन सुधारण्याचे शस्त्र आहे. एखाद्याचे जीवन बदलण्याचे हे कदाचित सर्वात महत्त्वाचे साधन आहे. मुलांचे शिक्षण घरापासून सुरु होते. शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता निश्चितच ठरवते. शिक्षणामुळे व्यक्तीचे ज्ञान, कौशल्ये सुधारते असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. तालुक्यातील निमगाव येथे दि. 29 ऑगस्ट गुरुवार रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मातंग संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भारत खडसे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तर लसाकमचे महाराष्ट्र सचिव गुणवंत काळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, काँग्रेसचे जिल्हा सचिव पंजाबराव चव्हाण, साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर कदम, सुर्यवंशी...
