Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळी बंद होण्याच्या चर्चेने चालकांना धास्ती
नांदेड| शासनाच्या दृष्टीने भुकेलेल्यांच्या पोटासाठी २६७ कोटी हा खर्च तसा नगण्य आहे. त्यामुळे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी, अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी केली आहे.
गोरगरिबांच्या खिशाला परवडेल असं सकस अन्न मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्यभर शिवभोजन थाळी ही योजना २०२० साली सुरू केली होती पुढे ती एकनाथ शिंदे यांच्या काळातही सुरू होती परंतु अलिकडे पुन्हा एकदा महायुती मोठ्या बहुमताने सत्तेत आल्यानंतर शिवभोजन थाळी ही योजना बंद होणार या चर्चांनी शिवभोजन केंद्र चालकांसह अनेक गोर-गरीबांची झोप उडाली आहे.
शिवभोजन थाळी विषयी प्रतिक्रिया देतांना एका केंद्र चालकाने सांगितले की, अगदी १० रुपयात संपूर्ण आहार मिळाल्याने गोरगरीब कष्टकरी देखील खुश झाले. परंतु ही थाळी आता बंद पडण्याच्या चर्चा आहे. ईतक्या वाढत्या ...
