जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते झाला आज संपूर्णता अभियांनाचा शुभारंभ -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। भारत सरकारच्या निती आयोगामार्फत सुरू करण्यात आलेल्या आकांक्षित तालुका कार्यक्रमा अंतर्गत देशभरातील ५०० तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य-पोषण, शिक्षण, कृषी-संबंधित सेवा, मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या पाच क्षेत्रातील एकूण ४० निर्देशकांचा समावेश आहे.
यातील ६ निर्देशक जे 40 निर्देशकाशी एकमेकाशी निगडित आहेत असे 6 निर्देशक जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत १०० टक्के संपृक्त करण्यासाठी नीती आयोग मार्फत सध्या संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या संपूर्णता अभियानचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना , किनवट तहसीलदार शारदा चौंडीकर, माहूर तहसीलदार किशोर यादव, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, सर्व विभागाचे विभागप्...
