Dr. Rajendra Gonarkar ; अण्णा भाऊंच्या वैश्विक एकता व समतेच्या विचारांची अधिक गरज – डॉ. राजेंद्र गोणारकर
उस्माननगर l जातीभेद, गरिबी-श्रीमंतीतील विषमता आणि स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आपली लेखणी झगडवणारे थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे हे शोषितांच्या वेदनेचे साक्षीदारच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रवर्तक होते. त्यांनी माणसाच्या सन्मानाला आणि समतेच्या तत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून मानवी एकतेचा जागतिक संदेश दिला. आज देशाभिमानाच्या उदोउदोच्या वातावरणात अण्णा भाऊंच्या या वैश्विक दृष्टिकोनाची, सर्वसमावेशक मानवतेच्या विचारांची, अधिकच आवश्यकता आहे.
असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. नवीन नांदेड सिडको येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेत अण्णा भाऊ साठे यांचा आंबेडकर विषयक दृष्टिकोन या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाऊंच...
