Champatrao Dakore | दिव्यांगानी जिवाची पर्वा न करता मंत्रालय घेरावा आंदोलनात भाग घेतला – चंपतराव डाकोरे – NNL
नांदेड| मुंबईत अति पावसामुळे घराबाहेर पडु नये असे शासनाने सुटि देऊन जाहिर केले असताना शुरविर दिव्यांगानी जिवाची पर्वा न करता मंत्रालय घेरावा आंदोलनात भाग घेतला. आणि शासकीय सुविधांचा लाभ मिळत नसल्याने आपल्या पोटाची आग कशी असते ते दाखवून दिले ? आतातरी शासन जागे होईल काय? असा प्रश्न चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रातील दिनदुबळे उपेक्षित दिव्यांचा ना हक्क मिळत नसल्यामुळे शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि.१० जुलै २०२४ रोजी मंत्रालय घेराव आंदोलनात भर पावसात शासनाने अतिपावसामुळे सार्वजनिक सुट्टी जाहिर करुन जनतेनी घराबाहेर पडु नये असे आव्हान केले. असे असताना आपल्या जिवाची पर्वा न करता महाष्ट्रातुन दिव्यांचा बांधव मंत्रालयावर धडकताच पोलिस बळाचा वापर करुन दिव्यांगाना अटक करून आझाद मैदानावर नजर कैदेत ठेवले. तर अनेक ठिकाणी दिव्यांगाना अटक केली तरी अनेक दिव्यांग मंत्रालय ...
