Dr. Shrikant Patil : ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – डॉ. श्रीकांत पाटील
नांदेड, प्रतिनिधी| ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी व उद्योजक यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून, स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले.
स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकात घेतलेल्या नव्या धोरणात्मक निर्णयांमुळे कृषी, ग्रामीण आणि डीप टेक क्षेत्रातील नवोपक्रमांना मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे आयोजित ‘प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संवाद’ या विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. महेश कोकरे, विविध स्टार्टअप्सचे प्रतिनिधी, प्राध्यापक, उद्योग क्षेत...
