राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व – डॉ. पंडित विद्यासागर यांचे प्रतिपादन -NNL
नांदेड| ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता देशभर सुरू आहे. या धोरणाबद्दल बरेवाईट बोलले जात असले तरी कोणत्याही धोरणाचे यशापयश हे त्या धोरणाच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते. सध्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेतही बदल व्हायला हवा’, असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षणतज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क’ या विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. व्याख्यान सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ...
