Thursday, May 14

Tag: Farmers should not rush

monsoon : मान्सून स्थिर होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचं आवाहन

monsoon : मान्सून स्थिर होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचं आवाहन

नांदेड, कृषी, व्हिडीओ
नांदेड| यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप मोठया प्रमाणात आलेला आहे. हा पाऊस पुढच्या काही दिवसात स्थिर राहणार असला तरी हा अनियमित आणि अस्थिर स्वरुपाचा पाऊस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी शेतकरी बांधवांना केले आहे. शेतकऱ्यांनी मान्सून स्थिर झाल्यावरच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करावी. पेरणीची घाई करु नये. आता पेरणी केल्यास पीकावर किड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सून स्थिर होण्यापूर्वी पेरणी केल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही. आताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करावीत व मान्सून स्थिर होण्याची वाट पाहावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे....
error: Content is protected !!