Collector Rahul Kardile : बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड| महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यावर अनेकांनी आकलन केले असून असे दिसून येते की आपण प्रमाणभाषा जास्त फोकस केली आहे. कोणत्याही भाषेचा मेन गाभा त्या भाषेतील लवचिकता, साधेपणा, सौंदर्य आहे. भाषेचा लिंग्विस्टिक न्यूनगंड विकसित होता कामा नये. अलीकडे भाषेमधून लवचिकता, साधेपणा कमी होत चालला आहे आणि बोलीभाषा फोकस न केल्याने वाचन संस्कृती रुजत नसल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी येथे बोलताना व्यक्त केले.
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान द्वारा ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत नररहर कुरुंदकर यांच्या 44 व्या स्मृतिदिनानिमित्त वाचन: साद आणि प्रतिसाद विषयावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी अनौपचारिक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन सायन्स महाविद्यालयाच्या पुरणमल लाहोटी सभागृहात करण्यात आले होते. व्यासपीठावर संवादक डॉ. विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती. य...
