Yugalsharanji Maharaj : सत्संगाने प्रेरित होवून भक्ती मार्गक्रमणा करणे म्हणजेच उपासना-युगलशरणजी महाराज
नांदेड| संतांच्या संगतीत राहून त्यांच्या विचारांशी आपले विचार जोडून भक्ती मार्गावर चालत राहणे हीच खरी उपासना आहे, असे प्रतिपादन गोडीया वैष्णवाचार्य युगलशरणजी महाराज यांनी आज येथे केले.
सत्यनारायण नंदकिशोर बजाज आणि बजाज कुटुंबाच्या वतीने येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या भागवत ज्ञानयज्ञाचे तिसरे पुष्प गुंफतांना युगलशरणजी महाराज बोलत होते. आजचा विषय नृसिंह चरित्र हा होता.
महाराजांनी आपल्या निरुपणाची सुरुवात गोविंद के गुण गाईये, गोपाल के गुण गाईये या मधूर गीताने केला. महाराजांच्या सुमधूर आवाजाने आणि गीतातील प्रभावी शब्दांनी वातावरण भक्तीमय केले. त्यानंतर युगलशरणजी महाराज यांनी ज्योत से ज्योत जगाते चलो हे गीत निरुपणासाठी घेतले. ते म्हणाले की, आपल्याला इतरांविषयी प्रेम असेल तर भक्ती मार्गावरुन जाणे सुलभ होते. तसेच परमेश्वराविषयीचे प्रेम मनात असणे आणि इतरांमध्ये ईश्वर पाहून ईश्व...
